कार्यालय वेळ: 10:00 am - 05:00 pm

Chhatrapati Shivaji Maharaj
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj
Savitribai Phule
महाराष्ट्र शासन
ग्रामपंचायत जाधववाडी
अधिकृत संकेतस्थळ
Mohandas Karamchand Gandhi
Dr. Babasaheb Ambedkar
Swami Vivekananda

ग्रामपंचायत जाधववाडी

आमच्याबद्दल

जाधववाडी हे गाव पंढरपूर पासून 21 किलोमीटर अंतरावर असुन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी व मारुती मंदिर देवस्थान वसले आहे.या गावाच्या पंचक्रोशीत बार्डी करकंब भोसे पांढरेवाडी मेंढापूर ही गावे असून या गावातील भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर व मारुती मंदिर देवस्थानाचे दर्शन घेतल्याखेरीज कोणतेही काम सुरु करत नाहीत. श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी व मारुती मंदिर देवस्थान हे फार वर्षापासून जाधवाडी गावामध्ये अस्तित्वात आहे.सदर देवस्थान हे जागृत असून नवसाला पावणारे आहे.दरवर्षी चैत्र शुद्ध राम नवमीला यात्रेची सुरुवात होऊन नवव्या दिवशी यात्रा संपते. यावेळी मारुती मंदिर देवस्थानाची यात्रा भरते. पहिल्या दिवशी सप्ताह ला सुरुवात होऊन दररोज सकाळ संध्याकाळ महाप्रसाद वाटप होते दुसऱ्या दिवशी कीर्तन व राम कथा, चौथ्या दिवशी भागवत कथा,पाचव्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम व भारुड,सहावा दिवस दिवशी गोड नैवेद्य, सातव्या दिवशी हरिपाठ,आठव्या दिवशी विविध स्पर्धेचे आयोजन नव्या दिवशी दिंडी प्रदक्षिणा पालखी मिरवणूक व यात्रेचे समारोह असतो. तसेच दर पंधरा दिवसाच्या व महिन्याच्या एकादशीला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कीर्तन प्रवचन असते.यावेळी सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जातो जाधव वाडी पंचक्रोशीतील भक्त जणांचे देवावर खूप श्रद्धा आहे. सुमारे 100 वर्षांपूर्वी मंदिराची स्थापना झालेली आहे.

गावाची स्थिती:

आमचे गाव तालुका मुख्यालयापासून योग्य अंतरावर वसलेले असून, जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात स्थित आहे. गावास पक्के रस्ते, वाहतूक सुविधा व आसपासच्या गावांशी चांगली संपर्क व्यवस्था उपलब्ध आहे. शेती, बागायती व स्थानिक व्यवसाय हे गावाच्या अर्थव्यवस्थेचे मुख्य आधार आहेत. शिक्षण, आरोग्य व पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधा गावात उपलब्ध असून गावाचा विकास सातत्याने प्रगतीपथावर आहे.

मुख्य व्यवसाय:

जाधव वाडी गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून मुख्य पीक द्राक्ष आहे. जाधववाडीसारख्या ग्रामीण भागात शेती व शेतीपूरक व्यवसाय, छोटे दुकानदार व्यवसाय आणि सेवा-आधारित उद्योग चांगले चालू शकतात. भाजीपाला शेती, सेंद्रिय शेती, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन आणि मधमाशी पालन हे उत्पन्न देणारे पर्याय आहेत.कमी गुंतवणुकीत आणि स्थानिक मागणीवर आधारित असल्यामुळे हे व्यवसाय जाधववाडीमध्ये स्थिर उत्पन्न देऊ शकतात.

वस्ती आणि सामाजिक संरचना:

गावातील वस्ती प्रामुख्याने केंद्रित व नियोजनबद्ध स्वरूपाची असून विविध समाजघटकांचे लोक एकत्रितपणे गुण्यागोविंदाने राहतात. गावात विविध जाती-धर्माचे नागरिक असून परस्पर सहकार्य, सामाजिक ऐक्य व सलोखा ही गावाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. संयुक्त कुटुंबपद्धतीसोबतच अणुकुटुंबांची संख्याही वाढत आहे. सण-उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम व ग्रामसभा यांच्या माध्यमातून सामाजिक सहभाग व एकोप्याची भावना अधिक दृढ होते.

पायाभूत सुविधा:

गावामध्ये रस्ते, वीज, पाणीपुरवठा व स्वच्छता यांसारख्या मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. अंतर्गत रस्ते व मुख्य जोडरस्ते सुस्थितीत असून सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध आहे. घरगुती वीजपुरवठा, स्ट्रीट लाईट्स तसेच पिण्याच्या पाण्यासाठी नळपाणी योजना कार्यरत आहे. शिक्षणासाठी शाळा, आरोग्यासाठी उपकेंद्र, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, सार्वजनिक शौचालये व कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. डिजिटल सेवा, इंटरनेट सुविधा व शासकीय योजनांची अंमलबजावणी यामुळे गावाचा विकास वेगाने होत आहे.

नोकरी आणि व्यवसाय:

या गावातील नागरिक शेतीसोबतच विविध नोकरी व व्यवसायांमध्ये कार्यरत आहेत. काही युवक शासकीय व खासगी नोकऱ्यांमध्ये कार्यरत असून शिक्षण, आरोग्य, पोलीस, बांधकाम व सेवा क्षेत्रात रोजगार मिळवतात. स्थानिक पातळीवर किराणा दुकाने, लघुउद्योग, हस्तकला, बांधकाम कामगार, वाहतूक सेवा व स्वयंरोजगाराचे उपक्रम सुरू आहेत.

जाधववाडी गावाचा आढावा

ग्रामपंचायत

जाधववाडी

ग्रामपंचायत स्थापना

1994

क्षेत्रफळ

520.36 हेक्टर

तालुका

पंढरपूर

जिल्हा

सोलापूर

राज्य

महाराष्ट्र

लोकसंख्या

2480

पुरुष

653

स्त्री

532

कुटुंब संख्या

493

शेतकरी संख्या

528

मतदारांची संख्या

1185

लागवडी योग्य क्षेत्र

479.31 हेक्टर

बागायत क्षेत्र

461.20 हेक्टर

स्ट्रीट लाईट पोल

63

अंगणवाडी

2

जिल्हा शाळा

1

पोस्ट ऑफिस

नाही

तलाठी ऑफिस

आहे

आरोग्य उपकेंद्र

नाही

नळ कनेक्शन

119

सार्वजनिक विहीर

1

सार्वजनिक बोअर

8

सार्वजनिक पाण्याचा आड

1

महिला बचत गट

7

प्रधानमंत्री घरकुल लाभार्थी

135

माननीय मंत्री व पदाधिकारी

माननीय मुख्यमंत्री

श्री. देवेंद्र फडणवीस

माननीय उपमुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे

माननीय उपमुख्यमंत्री

श्रीमती. सुनेत्रा पवार

प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री. एकनाथ डवले

मुख्य कार्यकारी अधिकारी,

श्री कुलदीप जंगम

उपमुख्य कार्यकारी अधिकारी

श्री. सूर्यकांत भुजबळ

ग्रामपंचायतीचे पदाधिकारी

ग्रामपंचायत अधिकारी

प्रशांत भानुदास कुंभार

गटविकास अधिकारी

श्री अमोल जाधव

प्रशासक

श्री. एस के रकटे

आमच्या सेवा

आम्ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या उत्कृष्ट सेवेसाठी पूर्णपणे समर्पित आहोत. पारदर्शकता, जबाबदारी आणि गुणवत्तेमुळे उत्तम सेवा देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे.

license

जन्म-मृत्यू प्रमाणपत्र

जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांसाठी ऑनलाइन अर्ज

home

गृहनिर्माण योजना

प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर गृहनिर्माण योजनांसाठी अर्ज

healthcare

आरोग्य सेवा

प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण आणि आरोग्य तपासणी सुविधा

gear

पाणी पुरवठा

स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पाणी कनेक्शन सेवा

graduation

शिक्षण सहाय्य

शिष्यवृत्ती, मिड-डे मील आणि शैक्षणिक सुविधांची माहिती

social-care

सामाजिक सुरक्षा

वृद्धावस्था पेन्शन, अपंगत्व पेन्शन आणि इतर सामाजिक योजना

tax

कर व परवाने

मालमत्ता कर, व्यावसायिक परवाना आणि इतर कर संबंधी सेवा

सरकारी योजना

नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आमच्या गावात प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत.

प्रधानमंत्री आवास योजना

या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बेघर किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत प्रदान केली जाते. या घरांमध्ये शौचालय, स्वयंपाकघर, वीज आणि स्वच्छ पाण्याची सुविधा समाविष्ट असते.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना कामाची हमी देणारी योजना आहे, ज्यामुळे रोजगारनिर्मिती, आर्थिक स्थिरता, सामाजिक समावेश आणि ग्रामीण विकास सुनिश्चित होतो.

स्वच्छ भारत मिशन

स्वच्छ भारत मिशन ही भारत सरकारची राष्ट्रीय योजना आहे, जी स्वच्छता सुधारण्यासाठी, शौचालयांची निर्मिती करण्यासाठी, कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि जनजागृती वाढवण्यासाठी राबवली जाते.

मिड डे मील

मिड डे मील योजना ही शालेय विद्यार्थ्यांना पोषक आहार देणारी भारत सरकारची योजना आहे, ज्यामुळे शालेय उपस्थिती वाढते, पोषण सुधारते आणि मुलांचा शारीरिक तसेच मानसिक विकास साधता येतो.

गावातील मंदिरे

सोनवडे गावात विविध धार्मिक स्थळे आहेत जी स्थानिक लोकांसाठी श्रद्धेचे केंद्र आहेत. येथे ज्योतिर्लिंग मंदिर, विठ्ठल-रखुमाई मंदिर आणि गणपती मंदिर प्रमुख असून, येथील लोक विविध सण आणि उत्सव आनंदाने साजरे करतात.

jyotirling

ज्योतिर्लिंग मंदिर

Vitthal-Rakhumai-temple

विठ्ठल-रखुमाई मंदिर

ganeshtemple

गणपती मंदिर

विविध दाखले मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश- २०१५ नुसार ऑनलाईन पद्धतीने जन्म नोंद/ मृत्यू नोंद/ विवाह नोंदणी दाखला/ दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला/ ग्रामपंचायत येणे बाकी दाखला/ ८ अ उतारा/ निराधार असल्याचा दाखला मागणी करण्यासाठी खालील फॉर्म भरुन पाठवा.


आमचे स्थान

जाधववाडी,  ता. पंढरपूर जि. सोलापूर